पाच वर्षांत देशात सर्वात जास्त आत्महत्या – खा.सुप्रियाताई सुळे

जिंतूर:-भाजप सरकारवर खरडून टिका करत हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे नसून या पाच वर्षात देशात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या झाल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांनी केला. आज (ता.१०)संवाद यात्रेनिमित्त जिंतुर येथील जिल्हा परिषद मैदानावर करण्यांत आले. 


यावेळी आ. बाबाजानी दुर्राणी शिवचरित्र व्याख्याते प्रा.यशवंत गोसावी, छगन शेरे (प्रदेश उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड), सौ.उज्वलाताई विश्वनाथ राठोड (अध्यक्षा जि.प.परभणी ), सारंगधर महाराज, जि.प.सदस्य श्रीमती शालिनीताई शिवाजीराव राऊत, श्रीमती इंदूबाई आसारामजी घुगे, मीनाताई नानासाहेब राऊत, अरुणा अविनाश काळे, संगीता विठ्ठल घोगरे, नमिता संतोष बुधवंत, ममता मुरलीधर मते, अजय चौधरी, बाळासाहेब रोडगे यांच्यासह इंदुमती मधुकर भवाळे( सभापती प.स.जिंतूर) विजय खिस्ते (उपसभापती प.स.जिंतूर), सबिया बेगम कपिल फारुकी (अध्यक्षा न.प.जिंतूर) बाळासाहेब भांबळे आदि उपस्थित होते. 





पुढे त्या म्हणाल्या, की सरकारने केलेली नोटबंदी सपशेल फसली असून देशाची अर्थव्यवस्था यामुळे डबघाईस वरी असल्याचे त्या म्हणाल्या . सरकारने जनतेची दिशा भूल केली असून भाजपात सर्वात जास्त भ्रष्टमंत्री आहेत. येत्या निवडणुकीत जनता त्यांना माफ करणार नसून मतदारच त्यांना त्यांची जागा दाखवतील असा ठाम विश्वासदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. प्रकर्षाने महिलांच्या आडी आडचणी समजून घेतल्या.महिलांना सशक्त बनवण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून विविध कर्जे उपलब्ध करून देण्यासाठी आणखी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचा त्यांनी विश्वास दिला. 



राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्रानी यांनी भाषणाच्या सुरवातीस ससंदरत्न खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांचा गुणगौरव केला. देशातील सरकार जातिवाद करण्यात गुंतलेले आहे. तसेच जिंतूर तालुक्यातील माजी आमदार यांनी शेतकऱ्यांचा पिकविम्यात अपहार केला होता. भाजपात गेल्याने त्यांनी मलीन प्रतिमा स्वच्छ होत असल्याची गमतीशीर फिरकी घेतली. 




आ.विजय भांबळे यांनी जिंतुरचा विकासाने काया पालट केला असून विरोधकांना बोलण्याची संधी राहिली नसल्याचे स्पष्ट केले. आ.विजय भांबळे यांनी आपले मनोगत व्यत्क करताना आपण निवडून आल्यापासून मतदार संघ कधीही सोडला नसून विविध योजनेच्या माध्यमातून मतदार संघात ५०० कोटी पेक्षा जास्त निधी खेचून आणला. तालुक्यातील रस्ते, शिक्षण, वीज, आरोग्य यासाठी आपण कमी पडलो नसून जनतेसाठी आपले दरवाजे सदैव उघडे आहेत . मतदारसंघातील काही लोक निवडणुकीपुरते मतदार संघात फिरत असून निवडणूक होताच ५ वर्षे गायब होतात.

Post a Comment

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget